मुंबई : राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात नवे सरकार येऊन दोन दिवस होतात न होतात तोच आता विधानसभा अध्यक्षाचे वेध लागले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची निवड सुद्धा अटीतटीची होणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) यांनी उमेदवारी देण्याती आली आहे, तर भाजपाकडून आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना विधानसभा अध्यक्षपदाची (Speaker of the Legislative Assembly election) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
[read_also content=”शिंदे गट गोवा विमानतळावर दाखल, गोव्याहून सर्व आमदार मुंबईसाठी रवाना https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-group-arrives-at-goa-airport-all-mla-leave-goa-for-mumbai-299852.html”]
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गोवा विमानतळावर दाखल झाले असून, सर्व बंडाळी गट मुंबईसाठी रवाना होत आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी Anna Hazare and cm Phone call) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी “काही काम असेल तर हक्काने आदेश द्या…आपले काम हे आमच्यासाठी संधी असेल”, असं फोनवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अण्णा म्हटले. शिंदे व अण्णा हजारे यांच्यात फोनवरुन संवाद झाल्याचे समजते. उद्या विधानसभा अध्यक्ष निवडणूक होत असून, आमच्याकडे एक तृतीयाअंश मतदान असल्यामुळं व्हिपचा आमच्यावर परिणाम होणार नसल्याचं शिंदे गटाने म्हटले आहे.