Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणतेय, संभाजीनगर राड्याला..’, संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका

मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत काेर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला हा धक्का मानला जात आहे. तर यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टिका केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 30, 2023 | 10:52 AM
‘जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणतेय, संभाजीनगर राड्याला..’, संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई– महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून वाढत चाललेल्या हिंदू जनजागृती मोर्च्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्र सरकारला (State government) खडे बोल सुनावले आहेत. तुम्हाला जर मोर्च्यावर किंवा राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण राखता येत नसेल तर, मग तुमची गरजच काय? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, “राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे. मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत काेर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला हा धक्का मानला जात आहे. तर यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टिका केली आहे.

काय म्हणाले राऊत?

शिंदे-फडणवीस सरकार राज्यात बेकायदेशीरपणे आले आहे, तेव्हापासून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. काल सर्वोच्य न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. कोर्टाबरोबर आता ‘जनता देखील शिंदे सरकारला नपुंसक म्हणतेय, त्यामुळं हे सरकार किती व कसे चालते याचा अंदाज येईल. कायदा सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत याचाच प्रत्यय संभाजीनगरमध्ये दिसतोय. संभाजीनगर राडा झाला आहे, या सरकराचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचं दिसून आले, असं म्हणत संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील जनता या सरकारला नपुसक, बिनकामाचे असे म्हणत आहेत. आता यामागे तर आम्ही नाहीत. जर सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारविषयी हे निरीक्षण आहे, तर यावरून सरकारची प्रत, प्रतिष्ठा काय आहे? हे सरकार सत्तेवर कशाप्रकारे आले? आणि काम करतेय हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झाले”, असे संजय राऊत म्हणाले.

आतापर्यंत न्यायालयाने सरकारविषयी नपुंसक शब्द वापरला नव्हता

दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात सध्या काय सुरु आहे, हे समजत नाही. दोन गटात हाणामारी, राडा होतो हे गंभीर आहे, यातून कायदा व सुव्यवस्था आबाधित नसल्याचं दिसतं. दरम्यान, विशेषत: मुख्यमंत्री स्वत:ला गुलाम असल्याची रोज जाणीव करून देत आहेत. बसू का, खाऊ का, जेऊ का, उठू, डोळे मिटू का, डोळे उघडू का, बोलू का, वाचू का, यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर हल्लाबोल केला. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही राज्याच्या सरकारविषयी नपुंसक असा शब्द वापरला नव्हता. आम्ही नेहमी सांगतोय की हे सरकार अस्तित्वातच नाही. महाराष्ट्रात विविध मार्गानी जातीय आणि धार्मिक तणाव वाढावे, दंगली व्हाव्यात, अस्थिरता राहण्यासाठी हे सरकार राजकारण करतंय”, असेही संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केला.

काय म्हणाले सर्वोच्य न्यायालय?

महाराष्ट्रात ४ महिन्यांत निघालेले हिंदू जनजागृती मोर्चे व द्वेषपूर्ण भाषणांविरोधात केरळचे याचिकाकर्ते शाहिन अब्दुल्ला यांनी द्वेषपूर्ण भाषणांबाबत काेर्टाने आदेश देऊनही त्याचे उल्लंघन झाल्याबद्दल अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती के.एम.जोसेफ आणि न्या.बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी नेत्यांनी राजकारणात धर्माचा वापर थांबवला तर राजकारण आणि धर्म यांची सरमिसळ थांबून आपोआपच विखारी भाषणे-वक्तव्ये बंद होतील, असे परखड मत न्यायालयाने व्यक्त केले. तुम्हाला जर मोर्च्यावर किंवा राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण राखता येत नसेल तर, मग तुमची गरजच काय? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. तसेच सरकारला न्यायालयाने नपुंसक म्हणाले आहेत.

दानवेंकडून MIMवर आरोप…

संभाजीनगर शहरातील (Sambhaji Nagar) किराडपुरा (Kiradpura Dangal) परिसरात काल रात्री झालेला राडा कुणी घडवला, हे शोधून काढा. शहरातल्या लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे. शहरात त्यांना दंगल पाहिजे, मतांसाठी हे राजकारण सुरु आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज सकाळी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.

Web Title: People are calling shinde government impotent sambhajinagar council sanjay raut criticism of shinde fadnavis government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2023 | 10:35 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
1

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

बोगस उपसूचना प्रकरण: विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; आयुक्तांकडे केली मोठी मागणी
2

बोगस उपसूचना प्रकरण: विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; आयुक्तांकडे केली मोठी मागणी

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू
3

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश
4

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.