Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका! इंद्रायणीला महापूर, देवस्थानचे आवाहन
सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २२ ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या असून, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून २२ रस्ते बंद करण्यात आले होते. संबंधित ठिकाणी रस्त्यावरील माती, दगड आणि दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मंगळवारी रात्रीपर्यंत सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, घाटमाथा क्षेत्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी घडलेल्या पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये जिल्ह्यात सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला असून , रविवारचा एक आहे मिळून दोन दिवसात पाच मृत्यू झाले आहेत.
२० जण जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, पुढील २४ तासही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भारतीय हवामान विभाग (आयएमडी) तसेच संबंधित विभागांशी चर्चा करून खडकवासला धरण साखळीमधून १० हजार क्युसेकने विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.
यंदा आषाढी वारीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सांगत, भाविकांच्या सोयीसाठी जर्मन हँगरची संख्याही वाढविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मावळमध्ये मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत; महामार्ग व रेल्वे वाहतूक ठप्प






