Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही
Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या जेष्ठ नागरिक सभागृह येथे महावितरणतर्फे आयोजित ग्राहक समाधान शिबिरात उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्र शासनाच्या वीज वितरण क्षेत्रातील आधुनिकीकरणाच्या धोरणांतर्गत देशभरात टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे.
पारंपरिक मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटर हे अधिक अचूक, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख तंत्रज्ञान असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. स्मार्ट मीटरमुळे जास्त वीज बिल येत असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असल्या, तरी आजपर्यंत बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत अत्यल्प तक्रारी प्राप्त झाल्या असून प्राप्त प्रत्येक तक्रारीची संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करूनच पडताळणी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (फोटो सौजन्य – AI Created)
वीज वापरात वाढ होण्यामागे केवळ मीटर कारणीभूत नसून, यंदा ‘एल निनो’ या हवामान बदलाच्या परिणामामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे एसी, कुलर, पंखे, फ्रिज आदी विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने वीज वापरही वाढला असून, त्याचा परिणाम बिलावर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; तक्रारदाराचाच यू-टर्न?
स्मार्ट मीटर संदर्भात एखाद्या ग्राहकाची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्याऱ्यांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटरची तपासणी, वीज वापराची घडताळणी आणि तांत्रिक परीक्षण केले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शंका असल्यास ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृतपणे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






