या वेळी प्रमुख मार्गदर्शन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा वर्णे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्याने सर्व गट तट बाजूला सारून आजच्या सभेस झालेली उस्फूर्त गर्दी शेतकरी एकजुटीची नांदी असून,साताऱ्याच्या क्रांतिभूमीत जगाच्या पोशिंद्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकताना लवकरच वर्णे ते सातारा सर्व बाधित शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ यांना सोबत घेऊन लॉंगमार्च काढनेची घोषणा करत, या साठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याविषयाकडे गांभीर्याने पाहून बाधित शेतकरी व स्थानिकांचे म्हणणे ऐकून न घेता प्रशासनाने हा निर्णय लादूनये तसेच आपली व्यक्तिगत भूमिकाही लोकप्रतिनिधीनी स्पष्ट करावी अन्यथा ‘देगाव’ प्रमाणे आम्हास शासनाचे विरोधात न्यालयीन लढाई लढणे क्रमप्राप्त होईलअसा इशारा दिला.
यावेळी राष्ट्रवादी (श.प) प्रदेश सचिव प्रविण धसके यांनी बोलताना या अधिसूचनेवर शासनाने हरकती मागवून त्यावर बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देने गरजेचे असून शासनाने मुळातच या क्षेत्राचे सिंचनासाठी जिहे कठापुर योजनेतून 2100 कोटीचा निधी मंजूर केला आहे,तसेच जलयुक्त शिवार योजनेतून करोडो रुपयांची जलस्त्रोत वाढवण्याची कामे जमीन उपचार पद्धतीनुसार केली गेली असताना midc लादणे म्हणजे शासनाच्या निधीचा एक प्रकारे गैरवापर असलेचा गंभीर आरोप केला. यावेळी माजी जी.प. सदस्य तथा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा आर्चनाताई देशमुख ,स्वाभिमानी चे मनोहर येवले आजी माजी सैनिक संघटनेचे जवान,बाधित शेतकरी यांनी उस्फुर्त मनोगते व्यक्त केली.
या जाहीर सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अर्जुनराव साळुंखे, ता अध्यक्ष रमेश पिसाळ तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,सर्व गावचे बाधित शेतकरी,ग्रामस्थ,विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.या सभेचे सुत्रसंचलन युवा निवेदक सुजित काळंगे यांनी केले.






