नैसर्गिक संकटांपासून पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २४२ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी सुमारे १ कोटी रुपये भरले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील करंजी-काजी परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाले असून सहा विद्यार्थ्यांवर गंभीर अवस्थेत सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समुद्रपूर तालुक्यातील भोसा (गौळ), उमरा आणि मार्डा परिसरात मुसळधार पावसानंतर बंधाऱ्यात कचरा अडकल्याने नदीचे पाणी शेतांमध्ये घुसले. यामुळे शेकडो एकरांवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील 14 धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्राचा 'क' दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण भागातील विकासकामांनाही गती मिळणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
सेलू शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या संथ कामामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. उघड्या नालीत दोन म्हशी अडकल्याच्या घटनेनंतर प्रशासन आणि कंत्राटदाराविरोधात संताप व्यक्त केला जात असून काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
वर्धा जिल्ह्यातील 153 जिल्हा परिषद शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात गळती छते, तडे गेलेल्या भिंती आणि जीर्ण अवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून शिक्षण विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.
वर्धा जिल्ह्यातील ३३ हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी स्पष्ट केले आहे.
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील 41 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दुसऱ्या शालेय गणवेशासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. शिक्षण विभागाने 1.48 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची मागणी वरिष्ठांकडे केली असून पालकांमध्ये नाराजी वाढली आहे.
वर्धा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. शहरातील ३० घरांत पाणी शिरले असून २७ संवेदनशील गावांवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे. आजही यलो अलर्ट कायम आहे.
वाठोडा परिसरात नर वाघाच्या हालचाली वाढल्याने वनविभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला असून १० गावांतील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Wardha News: जूननंतर जुलै महिन्यातही वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जलाशयांतील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाइन्स प्रकल्पाबाबत पर्यावरणीय जनसुनावणीपूर्वी अनेक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. प्रकल्पामुळे शेती, जंगल, जलस्रोत आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील ५१ हजार वीज ग्राहकांकडे महावितरणची ₹१२.३२ कोटींची थकबाकी आहे. विशेष वसुली मोहिमेंतर्गत जुलै महिन्यात ६०० हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वेळेत बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.