Pankaja Munde On Political retirement:समृद्धी हायवेसारखा राजकारणातही एक्झिट ; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
त्याचं झालं असं की, बीडच्या परळी येथे एका कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनाच्या समारोपावेळी एका कवीने राजकारणातील विलंबनात्मक कविता सादर केली. या कवितेला पंकजा मुंडे यांनी जोरदार दादही दिली. यावेळी बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “इथे आधी दोन पदरी रस्ता होता, आता चार पदरी, सहा पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी एवढं खोदून ठेवलंय की या रस्त्यावरून मी खडकत-खडकत इथपर्यंत पोहचले. गेल्या २४ वर्षांपासून एकाच संघर्षामुळे आता कंटाळा आला आहे. कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावंस वाटतं. पण जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते, नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. गेली २४ वर्षे त्याच प्रश्नांशी झुंज देत माझा हा प्रवास सुरू आहे.
मला मिळालेली लाल दिव्याची गाडी ही मला वैयक्तिक सोयींसाठी मिळालेली नाही. ती केवळ तुमचा विकास करण्यासाठी मिळाली आहे. जनतेच्या या अपेक्षा पूर्ण कऱण्यासाठी आणि रखडलेली विकासकामे अधिक गतीने मार्गी लावण्यासाठी यापुढे अधिक दुप्पट जोमाने काम करेल, ही गाडी, हे पद, ही ताकद, ही लाल दिव्याची गाडी हे सर्व हा प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्यासाठीच आहे.असंही पंकजा मुंडे यांनी नमुदं केलं.
आज आपण त्या देशात राहतो ज्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. याच व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये व्यक्त होण्याची मुभा दिली पाहिजे. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं नाही तरी सत्य बदलणार नाही. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवण्याचे थांबत नाही. म्हणून कोणाची सकारात्मक टीका ऐकण्याची ताकद आणि त्यातून सुधारण्याची देखील तयारी असली पाहिजे, असहीं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.






