अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या... (Photo Credit- X)
अजित पवार यांच्या निधनाची आठवण काढताना सुप्रिया सुळे यांचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, “माझ्या भावाला जाऊन आता पाच महिने पूर्ण झाले आहेत. आमचे संपूर्ण कुटुंब या मोठ्या दुःखातून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे आणि ताकदीने काम करावे, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून आणि पूर्ण ताकदीने तयार होतो.”
लाईव्ह |📍दिल्ली ⏭️ 17-07-2026 पत्रकारांशी संवाद
https://t.co/gRn273pR4H — Supriya Sule (@supriya_sule) July 17, 2026
‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, “ज्या दिवशी दादांचे निधन झाले, त्याच दिवशी आमच्या बाजूने ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रीकरणाचा मुद्दा पुढे आणला होता. परंतु, समोरच्या पक्षाने ते नाकारले. ‘अशी कोणतीही बैठक किंवा घटना कधी घडलीच नव्हती,’ असे त्यांनी सांगितले. एका बाजूला आम्ही आमचा सख्खा भाऊ गमावल्याच्या दुःखात होतो, तर दुसऱ्या बाजूला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत होतो. अशा वेळी त्यांच्या नकारघंटेने आम्हाला खूप वेदना दिल्या.”
सुनील तटकरेंच्या आजच्या विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर पूर्णविराम लावला. त्या म्हणाल्या, ‘आम्ही अत्यंत स्वाभिमानी लोक आहोत. आमच्या स्वाभिमानाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. ज्या दिवशी दादा गेले आणि त्यानंतर समोरच्या नेत्यांची जी विधाने मी पाहिली, त्यावरूनच मला स्पष्ट झाले की दादांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. म्हणूनच आम्ही तो विषय त्याच क्षणी कायमचा संपवला आहे. आता आमचे संपूर्ण लक्ष केवळ महाराष्ट्र आणि देशातील जनतेची प्रामाणिक सेवा करण्यावर केंद्रित आहे.”
‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका






