बुध्दांना तिने तब्बल 12 वर्षांनी पाहिलं होतं. जेव्हा बुद्ध घराबाहेर पडले तेव्हा यशोधरेला काहीच माहीत नव्हतं. बुध्दांना पाहून तिला धक्काच बसला. यशोधरा बुद्धांचीचं पत्नी त्यामुळे तिने मोठ्या हुशारीने बुद्धांना प्रश्न केला. तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला घरात राहून मिळालं नसतं का? ज्यासाठी तुम्ही घरादाराचा त्याग केला जंगलात राहिलात ते मिळालं तुम्हाला ? त्यावर बुद्ध म्हणाले की, जी मानसिक शांतता, प्रेम म्हणजे काय आणि दुःखाचं कारण शोधण्यासाठी मी घराबाहेर पडलो ते घरातच होतं पण त्याची किंमत कळण्यासाठी मला घर सोडावं लागलं. प्रेम, जवळची माणसं ही जोवर आपल्या आजुबाजूला आहेत तोवर त्यांची किंमत कळत नाही ती किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती माणसं आपल्यापासून लांब झालेली असतात. बुद्ध यशोधरेला उत्तर देतात आणि निघून जातात. गोष्टीच तात्पर्य हेच की जवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत लांब गेल्यावर कळते.
Gautam Buddha : आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग आणि त्याचा अर्थ






