हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! (Photo Credit- X)
हरमनप्रीत कौर आता भारतासाठी सर्वाधिक टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणारी क्रिकेटपटू ठरली आहे. तिने १० टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा टप्पा गाठला आहे, जी कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूसाठी सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या नावावर संयुक्तपणे होता; त्या दोघांनीही प्रत्येकी नऊ टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळल्या होत्या. मात्र, आता हरमनप्रीतने रोहितला मागे टाकले आहे. तिने आपली तंदुरुस्ती आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही कामगिरी साध्य केली आहे.
The leaders stepping up when it matters most 🤝 A highly clinical 5️⃣0️⃣-run stand between Harmanpreet Kaur and Smriti Mandhana 👏 Updates ▶️ https://t.co/1tfRc3jcrX#TeamIndia | #T20WorldCup | #WomenInBlue | @ImHarmanpreet | @mandhana_smriti pic.twitter.com/G5QYPJkED8 — BCCI Women (@BCCIWomen) June 14, 2026
हरमनप्रीतने २००९ च्या महिला टी-२० विश्वचषकात पहिल्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तेव्हापासून ती प्रत्येक टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग राहिली आहे. तिने २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०१८, २०२०, २०२३, २०२४ आणि आता २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या स्पर्धेतही ती संघाचे नेतृत्व करत आहे.
रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण नऊ टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळल्या होत्या. २००७ मधील पहिल्या टी-२० विश्वचषकापासून ते २०२४ पर्यंतच्या प्रत्येक स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. २००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०२१, २०२२ आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये रोहित भारतीय संघाचा भाग होता. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करत विजेतेपद मिळवून दिले; ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची टी-२० विश्वचषक स्पर्धा ठरली. त्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.






