सूर्यकुमारला बसणार धक्का श्रेयस अय्यरकडे कप्तानपद (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सूर्यकुमार यादव गेल्या काही काळापासून सातत्याने धावा करत नाहीये. तो ३५ वर्षांचाही आहे. जर निवड समितीने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला, तर श्रेयस अय्यर पहिली पसंती असू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, “अय्यर शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये खेळला होता. तो सध्याच्या संघाचा भाग नाही. त्याला परत आणणे आणि लगेचच कर्णधारपद सोपवणे हा एक मोठा निर्णय आहे.” सध्या सर्व लक्ष २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर केंद्रित झाले आहे, ज्यामुळे निवड समितीला टी-२० मधील नेतृत्व बदलाचे नियोजन करण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.
वानखेडेवर ‘अय्यर मॅजिक’, श्रेयसने हवेत उडून घेतला अद्भुत कॅच; रोहित-सूर्याचे डोळेच विस्फारले
IPL मध्ये श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीचा अहवाल
| मॅच | 92 |
| किती जिंकले | 52 |
| किती हरले | 35 |
| न सुटलेले सामने | 2 |
| अनिर्णित सामने | 3 |
बॅन बॅन बॅन…! पुन्हा ‘ही’ चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; BCCI मोठी कारवाई करणार
श्रेयस अय्यर २०१८ पासून कर्णधार
गौतम गंभीरने २०१८ च्या हंगामाच्या मध्यात दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर, २३ वर्षीय श्रेयस अय्यरने संघाची सूत्रे हाती घेतली. २०१९ मध्ये त्याने दिल्लीला प्लेऑफमध्ये आणि २०२० मध्ये संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. २०२२ मध्ये अय्यर केकेआरमध्ये सामील झाला. २०२४ मध्ये त्याच्या कर्णधारपदाखाली केकेआरने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. २०२५ मध्ये तो पंजाब किंग्समध्ये सामील झाला आणि संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.
२०२६ मध्ये सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला. तथापि, सूर्य बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याची बॅट चांगली कामगिरी करत नाहीये. सूर्या आयपीएलमध्ये कर्णधारपदही भूषवत नाही. याशिवाय यावर्षी आयपीएलच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या मार्गदर्शनाखाली एकही सामना हरलेला नाही आणि पंजाबची टीम ही सध्या १ क्रमांकावर आहे. गेल्यावर्षीदेखील श्रेयस अय्यरने पंजाबच्या टीमला फायनलमध्ये पोहचवले होते. मात्र ट्रॉफी जिंकू शकले नव्हते. गेल्या दोन वर्षापासून श्रेयस अय्यर उत्तम कप्तानी निभावत असल्याचे दिसून आले आहे.






