फोनवर अलर्ट वाजताच घाबरले लोकं... सुरु झाला गोंधळ, काय आहे नेमंक कारण? सरकारनेच केलं जाहीर
तुमच्या फोनवर देखील सायरन वाजल्याचा आवाज आला का? तुमच्या मनात देखील गोंधळ उडाला का? आता काय होणार, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात देखील आले आहेत का? घाबरू नका. ही केवळ एक चाचणी आहे. सरकारने आधीच जाहीर केले होते की, ‘आज 2 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देशातील सर्व नागरिकांच्या फोनवर एकाच वेळी अलर्ट वाजणार आहे. ही केवळ एक चाचणी असून घारबून जाण्याची गरज नाही.’
मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका… सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी
सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणेच आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देशातील सर्व नागरिकांच्या फोनवर एकाचवेळी सायरन वाजला. असे एकदा नाही तर दोन वेळा घडले. अचानक सायरन वाजल्याने अनेकजण घाबरले होते. फोन अचानक वायब्रेट झाल्याने लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता निर्माण झाली होती. मात्र काहीवेळाने सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या फोनवर वाजलेला सायरन ही केवळ एक चाचणी आहे. यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही.






