गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता (फोटो -टीम नवराष्ट्र)
गौतमी पाटील एका वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आली आहे. हे प्रकरण पुण्यातील आहे. हे प्रकरण एका अपघाताशी सबंधित आहे. गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालकासह ३ जण जखमी झाले होते. याबाबत आता रिक्षा चालकाच्या कुटुंबाने काही आरोप केले आहेत. या प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन केला असल्याचे समोर आले आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यावर आता रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील गाडीत बसलेली नव्हती असे समोर येत आहे. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन केला आणि गौतमी पाटीलला उचलायचं की नाही अशी विचारणा केली आहे. त्याबाबतच चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.
Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
रोहित पवारांचे भाष्य
चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना केलेल्या फोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रोहित पवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले,
माननीय चंद्रकांतदादा पाटील,
तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे.
माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही.
गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची… pic.twitter.com/eboE6Iqixc — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2025
पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…! आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?