जिल्हा मुख्यालयी असलेल्या बसस्थानकावर गेल्या २७ वर्षांपासून प्रवाशांची अविरत तहान भागवणारे ‘संत लहरी बाबा जल आशिष’ ही पाणपोई मागील काही महिन्यांपासून बंद पडली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद पडल्याने प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
समाजसेवी गोपीचंद बलवानी यांनी आपल्या माता-पितांच्या स्मृतीप्रित्यर्थ २९ मार्च १९९८ रोजी स्वखर्चातून या प्याऊची उभारणी केली होती. प्याऊची संपूर्ण देखरेख आणि पाण्याचा खर्च बलवानी परिवारच उचलत होता. या माध्यमातून दररोज सुमारे १ लाख लिटर शीतल जल 5 बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जात होते. प्याऊच्या वर आणि खाली बसवलेल्या मोठ्या स्टोरेज टॅक्सद्वारे २४ तास पाण्याची सोय होती.
Bhandara: ‘पशुसंवर्धन’तर्फे पशुधन रक्षणासाठी लसीकरण मोहीम; पशुपालकांना मिळणार मोठा दिलासा
प्रशासनाची अनास्था
कोणतीही पूर्वसूचना न देता एसटी र महामंडळाने हे जुने आणि हक्काचे प्याऊ बंद पाडून त्याऐवजी आपले “नाथ-जल” सुरू केले. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी मार्च २०२६ पासून प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आले; परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
बलवानी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, ९ मार्च २०२५ रोजी मार्ग निर्माण कार्यादरम्यान पाण्याच्या टंकीच्या आसपास मातीचे ढीग आणि बांधकाम साहित्य टाकण्यात आले. तसेच प्याऊच्या परिसरातील झाडे आणि कुंड्याही विनाकारण हटवण्यात आल्या. आता एसटी प्रशासन या जनहिताच्या कामालाच ‘अवैध’ ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बसस्थानकावर दररोज येणाऱ्या प्रवाशांना फटका बसत आहे.
जल आशिष प्याऊ बंद झाल्यानंतर 6 प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हण्णून इतर दानदात्यांच्या माध्यमातून तात्पुरती आरओ मशीन बसवण्यात आली आहे, ज्यामुळे सध्या प्रवाशांना पिण्यायोग्य पाणी मिळत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सेवा देणाऱ्या ‘जल आशिष प्याऊ’ साठी स्वच्छ आणि योग्य टीडीएस पातळीचे पाणी आवश्यक आहे. हे पाणी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी प्रशासन सकारात्मक प्रयत्न करेल. असे नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, भंडारा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.






