Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस rahul-narwekar-notice-to-urban-development-secretary-absent-officers मुंबईशी संबंधित महत्वाच्या विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुंबई महापालिका असेल किंवा नगरविकास सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याच्या मुददयावरून सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांनी आक्रमक होत तक्रार केली, संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दोन्ही बाजूंनी करण्यात आली. त्यावर याची दखल मी घेतली असून नगरविकास सचिवांना मी ताबडतोब नोटीस जारी करत असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुंबई महापालिका तसेच ठाणे व कल्याण महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर यामाध्यमातून चर्चा सुरू होती. मात्र या महत्वाच्या चर्चेच्या वेळी अधिकारी गॅलरीमध्ये एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. कायद्यांची अमलबजावणी करणारेच गायब होतात भाजपच्या अतुल भातखळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाने नियम २९३ चा प्रस्ताव मांडला आहे, पण महापालिका असेल वा नगरविकास असेल एकही संबंधित अधिकारी अधिकारी गॅलरीत उपस्थित नसल्याचे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या अधिवेशनात हा मुद्दा नवव्यांदा आला आहे. हे सभागृह सर्वोच्च सभागृह आहे. आपण कायदे करतो, अर्थसंकल्प मंजूर करतो. या अधिका-यांचे पगार आपण मंजूर करती पण अधिकारी उपस्थितच नसतात. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही नाना पटोले म्हणाले, या अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. चेंबूरला एका निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. मान्सूनपूर्व तयारीचे पैसे खर्च करूनही त्या बालकाचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, सरकारचा वचकच प्रशासनावर उरलेला नाही. हा केवळ सभागृहाचा नाही तर राज्यातील १४ कोटी जनतेचा अपमान हे अधिकारी करत आहेत. जयंत पाटील यांनी या अधिका-यांना आता सभागृहाची किमत राहिलेली नाही. राज्य त्याचेच आहे, असे त्यांना वाटते, जे गैरहजर असतील त्यांना किमान तीन दिवस निलंबित करा अशी मागणी केली. तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी यावेळी सभागृह सुरू असताना आयुक्त किवा संबंधित अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक होते. या आधी दोन वेळा लेखी खुलासा मागविला आहे. संबंधित अधिका-याकडून लेखी खुलासा मागवत आहोत. Rahul Narwekar, Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion, Absent Officers Assembly, Rule 293 Motion, Sudhir Mungantiwar, Atul Bhatkhalkar
सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदारसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या निवडणुकीत सातारा जिल्हा निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी आपले राजकीय लक्ष साताऱ्याकडे केंद्रित केले आहे.
या मतदारसंघात एकूण ८९५ मतदार आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ४७२ तर सांगली जिल्ह्यातील ४२३ मतदारांचा समावेश आहे. साताऱ्यातील मतदारांची संख्या अधिक असल्याने विजयाचा मार्ग मोठ्या प्रमाणात साताऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या मतदानावर अवलंबून राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने साताऱ्यातील धैर्यशील कदम यांना उमेदवारी देत महत्त्वाची राजकीय चाल खेळली आहे. कदम यांनी सोमवारी सांगली येथे समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक पातळीवरील त्यांचा संपर्क, संघटनात्मक कामकाजातील सहभाग आणि सातारा जिल्ह्यातील प्रभाव लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे मानले जात आहे.
लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा
महायुतीकडून साताऱ्याला दिलेले प्राधान्य लक्षवेधी ठरत आहे. जिल्ह्यात विविध पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य असल्याने मतदानाचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे पक्षीय निष्ठेबरोबरच उमेदवाराची प्रतिमा आणि वैयक्तिक संबंध यांचाही निकालावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही सक्षम उमेदवार मैदानात उतरविण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. विरोधकांनी ताकदीचा उमेदवार दिल्यास निवडणूक एकतर्फी न राहता चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत मतांचे विभाजन, अपक्षांची भूमिका आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व
सांगली-सातारा मतदारसंघातील ही निवडणूक केवळ विधानपरिषदेपुरती मर्यादित राहणार नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही तिच्याकडे महत्त्वाच्या राजकीय चाचणीच्या स्वरूपात पाहिले जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जानंतर सुरू होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीत साताऱ्यातील मतदारांचे महत्त्व अधिकच वाढले असून, याच मतांवर विजयाचे अंतिम समीकरण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.






