IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral
आयपीएललमध्ये सर्वात मजबूत स्थितीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पराभवा पत्कारावा लागला. परंतु, या पराभवानंतरही आरसीबीचे कोणतेही नुकसान झाले नाही, चांगल्या नेट रन रेटमुळे ते गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम राहिले. यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. २६ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. दुसरीकडे, हैदराबादला या विजयाचा फायदा झाला नाही. हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. यामुळे ते एलिमिनिटेर सामना खेळतील.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी चार ओव्हरमध्ये पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या, पण रसिक सलाम दारने हेडला २६ धावांवर बाद केले. त्यानंतर अभिषेक शर्माने इशान किशनसोबत मिळून फटकेबाजी केली. अभिषेकने अवघ्या २० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आणि २२ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. इशान किशननेही हेनरिक क्लासेनसोबत एक धडाकेबाज फलंदाजीची भागीदारी केली. क्लासेनने २४ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या, तर इशान किशनने ७९ धावा केल्या. नितीश रेड्डीनेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत १२ चेंडूंमध्ये नाबाद २९ धावा केल्या.
आरसीबीची मजबूत फलंदाजी हैदराबादविरुद्ध अपयशी ठरली. व्यंकटेश अय्यरने १९ चेंडूंमध्ये ४४ धावा करून वेगवान सुरुवात केली, पण तो ईशान मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर शकिब हुसेनने विराट कोहलीला १५ धावांवर बाद करून आरसीबीला मोठा धक्का दिला. देवदत्त पडिक्कल १४ चेंडूंमध्ये केवळ २१ धावाच करू शकला. रजत पाटीदारने ५६ धावा केल्या, पण त्याची खेळी खूपच संथ होती. कृणाल पांड्याने नाबाद ४१ आणि टिम डेव्हिडने नाबाद १५ धावा केल्या. अखेरीस, आरसीबी केवळ २०० धावाच करू शकली आणि ५५ धावांनी सामना हरली.
बंगळुरुने १४ पैकी ९ सामने जिंकून १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. गुजरात टायटन्सनेही १४ पैकी नऊ सामने जिंकले. हैदराबादनेही १४ पैकी नऊ सामने जिंकले, पण त्यांचा नेट रन रेट आरसीबी आणि गुजरातपेक्षा कमी आहे. आता, राजस्थानला चौथे स्थान मिळवण्याची उत्तम संधी आहे. राजस्थानचा सामना मुंबईशी होणार असून, त्या सामन्यातील विजयामुळे त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. पराभव झाल्यास केकेआर किंवा पंजाबला क्वालिफाय होण्याची संधी मिळेल.
IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’






