तळकोकणातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे.
लोहगाव येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या एका स्थानिक कार्यक्रमादरम्यान आमदार बापू पठारे आणि अजित पवार गटाचे बंडू खांदवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पण हा वाद चांगलाच चिघळला.
बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. तसेच शरद पवार यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केला आहे. या टीकेवर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं…
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविरोधात अर्वाच्च भाषेत टीका केली. यानंतर राष्ट्रवादीने पत्रक काढत आंदोलनाची घोषणा केली आहे.
Jayant Patil: आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या वडिलांचे नाव घेत त्यांच्यावर जहरी टीका केली…
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी तेथील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.
शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिष्यत्वावर देखील टोला लगावला.
पुणे शहर सध्या असंख्य अडचणींचा सामना करत असल्याचे नमूद करत पवार यांनी वाहतूक काेंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य सुविधांचा प्रश्न असे असंख्य प्रश्न पुणेकर नागरिकांना भेडसावत असल्याचे स्पष्ट केले.
बारामती शहराचा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) लवकरच समावेश होणार असून या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज, रविवार (दि. १४ सप्टेंबर) रोजी नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले.
कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून, शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी, बैठका, गटबाजी आणि आघाड्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे.
NCP Advertisement on Devabhau : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सर्व प्रमुख वर्तमानपत्रातून जाहिरातबाजी करत महायुतीला टोला लगावण्यात आला आहे. देवा आता तूच सांग अशा नावाखाली ही जाहिरात छापण्यात आली.
एकदिवसीय शिबिरासाठी शरद पवार यांचे रात्री उशीरा नाशिकमध्ये आगमन झाले असून, सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी खालच्या पातळीवर वक्तव्य करून धनगर ओबीसींचा मोठा अपमान केला आहे, धनगर समाजावर जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे, असे हाके म्हणाले.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केल्यानंतर शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली आहे. यावरुन मंत्री जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभूत झाले, असे संजय राऊत यांनी मानले आहे. बेस्टच्या निवडणुकीत 12000 मते पडली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारांनी नाकारलं. त्यांना 2000 मतेही पडली नाही.