फोटो सौजन्य - Social Media
SBI PO Admit Card 2026 जारी! 1,500 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेपूर्वी उमेदवारांनी ‘ही’ कामे नक्की करा
दिल्लीसह मुंबईतही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. हजारोच्या संख्येने मुंबईतील विद्यार्थी आझाद मैदान तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दाखल होत आहेत. परंतु, अनेकदा गर्दी होण्याआधीच मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. अभिनेत्री Ayesha Khan सोबतही सारखाच प्रकार घडला आहे. आंदोलन सुरु करण्यापूर्वीच, अभिनेत्रीला वरळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
नेमका काय प्रकार घडला?
मुंबईत आंदोलन सुरु होण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांना पोलिसांद्वारे बंदी करण्यात आले. त्यांना एका पोलीस कारमध्ये डांबून ठेवण्यात आले. यादरम्यान, कार चालवणाऱ्या पोलिसाने तरुणांना बजावले की ‘इथून जा. येथे परत दिसलात तर तुमच्या खिशात 50 ग्राम पावडर ठेवेल आणि आत टाकेल.’ पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिलेली ही धमकी पाहून लोकं चिताळले आहेत.
जर आंदोलकांनी आंदोलन केले तर त्यांना अमली पदार्थांच्या खोट्या आरोपाखाली अटक करू अशी धमकी एका कर्तव्यदक्ष पोलिसाकडून देण्यात आल्यामुळे वातावरण आणखीन चिघळले आहे. अशामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की ‘जर पोलीस अमली पदार्थ एखाद्याच्या खिशात टाकून त्याला खोट्या आरोपाखाली आत टाकू शकतात, म्हणजे त्यांच्याकडे अमली पदार्थांचा साठा किंवा स्रोत आहे. तर अशा पोलिसांकडून हा साठा कुठून येतो? या अमली पदार्थांच्या मुद्द्यात पोलिसांचीही तपासणी झाली पाहिजे का?’ असा सवाल उपस्थित होतो.






