४-दिवसांचा कामाचा आठवडा, पाकिस्तानात ५०% घरून काम, बांगलादेशात अनावश्यक प्रवासावर बंदी, भारताचे शेजारी देश तेलाच्या संकटाचा सामना कसा करत आहेत? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Bangladesh energy saving measures shopping malls : मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाने (US-Israel Iran War) आता दक्षिण आशियातील घराघरापर्यंत झळा पोहोचवल्या आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक-पंचमांश लोक या प्रदेशात राहतात आणि त्यांच्यासाठी इंधन हे केवळ वाहन चालवण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आवश्यक आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे तेल आणि एलपीजी वाहून नेणारी जहाजे समुद्रात अडकून पडली आहेत. जरी भारतासारख्या मित्र देशांना इराणने मर्यादित सवलत दिली असली, तरी पुरवठ्यातील तुटवड्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती आधीच नाजूक असताना या तेलाच्या संकटाने कंबरडे मोडले आहे. इंधन वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारने सरकारी कार्यालयांचे कामकाजाचे दिवस ६ वरून थेट ४ दिवसांवर आणले आहेत. इतकेच नाही तर, ५०% कर्मचाऱ्यांना घरून काम (Work From Home) करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या इंधन भत्त्यात ५०% कपात करण्यात आली असून लोकप्रिय टी-२० लीग ‘PSL’ आता रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवावी लागत आहे, जेणेकरून प्रेक्षकांच्या प्रवासावरील इंधन वाचवता येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Majid Khatami: ज्याच्या एका आदेशाने अमेरिकाही हादरत होती, अमेरिका-इस्रायलने त्यालाच केले ठार; गुप्तचर यंत्रणेचे मोडले कंबरडे
बांगलादेशात ऊर्जेची बचत करण्यासाठी शॉपिंग मॉल्स संध्याकाळी ७ वाजताच बंद केले जात आहेत. लग्नसमारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमात सजावटीच्या रोषणाईवर कडक बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, नेपाळमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. तिथे शाळांना आता दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नेपाळ सरकारने स्वयंपाकाच्या गॅसचे रेशनिंग सुरू केले असून पेट्रोल-डिझेल गाड्यांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. विमान इंधनाचे दर तिथे दुप्पट झाल्याने विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
From international outcast to mediator in Iran war, Pakistan’s remarkable makeover – https://t.co/KEm62DGB6a — Phil Stewart (@phildstewart) April 4, 2026
credit – social media and Twitter
श्रीलंकेत रोख रकमेची चणचण आणि इंधन टंचाईमुळे रेल्वे आणि बस सेवा मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. वीज दरात प्रचंड वाढ केल्यामुळे उद्योगांचे चक्र थांबले आहे. मालदीवसारखा छोटा देश आता पूर्णपणे भारताच्या मदतीवर अवलंबून आहे. भारताकडून इंधन पुरवठा मिळवण्यासाठी मालदीव सरकारने राजनैतिक प्रयत्न वेगवान केले आहेत, मात्र तिथेही इंधनाचे दर कडाडले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Ultimatum: ‘याच्या’ बदल्यात ‘Hormuz’ नाहीच; इराणला अमेरिकेची अट अमान्य; पाकिस्तानच्या प्रस्तावावर विचार सुरू
इतर शेजारी देशांच्या तुलनेत भारताने अत्यंत नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. जनतेवर महागाईचा बोजा पडू नये म्हणून सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी विमान इंधन आणि डिझेल निर्यातीवर ‘विंडफॉल टॅक्स’ लावून नफा कमावणाऱ्या कंपन्यांवर लगाम घातला आहे. तसेच, एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश देऊन सामान्य गृहिणींच्या स्वयंपाकघरातील गॅसचा पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घेतली आहे.






