
नवी दिल्ली– आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महागाई, बेरोजगारी, सतत इंधनाचे वाढत जाणारे भाव आदी आव्हानं सरकारसमोर असताना, आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, महिलांना, तरुणांना, उद्योजकांना, महाराष्ट्राला, मुंबईला काय मिळाले अशी चर्चा होत आहे. पाहूया अर्थसंकल्पातील दहा महत्वाचे मुद्दे…