अल्पवयीन मुलीवर केला दोघांनी जीवघेणा हल्ला
• जोशीबाग परिसरात 22 वर्षीय तरुणीसोबत भरदिवसा गैरवर्तनाची घटना
• नागरिकांनी आरोपी प्रथमेश जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
• महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली
कल्याण: कल्याण इथून एक धक्कादायक आणि संताप जनक बातमी समोर आली आहे. एक तरुणीसोबत भर रस्त्यात गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घडलेला प्रकार हा कल्याण शहरातील जोशीबाग परिसरात दिवसा घडला. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी एका तरुणाला याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.
काय नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार 22 वर्षे तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या कामावर जाण्यासाठी निघाली होती. ती जोशीबाग परिसरातून जात असताना अचानक एक तरुण तिच्यासमोर आला. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि वागण्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली. थोड्याच वेळाने त्या तरुणाने तरुणी सोबत भर रस्त्यात गैरवर्तन केले. त्यानंतर तिथून फळ काढला.
महिलेचा मोबाईल हॅक केला अन् 1.34 लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर…
हा धक्कादायक प्रकार परिसरातील काही नागरिकांच्या समोर घडला. भर असतात तरुणीसोबत असे काही होत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक संतप्त झाले. तातडीने नागरिकांनी आरोपीच्या दिशेने धाव घेत त्याचा पाठलाग केला. सुरुवातीला तो गर्दीचा फायदा घेत पसार पुण्यात यशस्वी ठरला होता. मात्र नागरिकांनी हार न मानता स्थानिक लोकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. अखेर नागरिकांनी त्याला शोधून काढले आणि थेट पोलिसांच्या हवाली केले.
या घटनेनंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिसांनी आरोपी प्रथमेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने महिला सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’ रागातून दिराने वहीनीचे डोके भिंतीवर आपटून केली हत्या; नेमकं प्रकरण काय?
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिरानेच आपल्या वहिनीची डोके फोडून हत्या केल्याच्या समोर आल्या. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला झारखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी केवळ 20 मिनिटांचा उशीर झाला असता, तर आरोपी नेपाळमधून फरार झाला असता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रावेतमधील गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; बिश्नोई गँगच्या तीन जणांना उत्तराखंडमधून पकडले
Ans: जोशीबाग परिसरात ही घटना घडली.
Ans: स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
Ans: महात्मा फुले पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






