१६ जुलै रोजी कल्याणच्या आडवली परिसरात मध्यरात्री अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून आरोपींनी अर्जुनवर तब्बल १६ वार करण्यात आल. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या वाचवण्यासाठी धावलेली प्रेयसीवरही हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुणे हादरलं! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधला लागले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पोलिसांनी सापळा रचून अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड या तिघांना बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव अविनाश झा असे आहे. त्याच्यावर दरोडा, मारहाण आणि खुनाचा प्रयत्न करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पोलिसांनी त्यांची दहशत संपवण्यासाठी त्यांना आडवलीमध्ये थेट रस्त्यावर चालवत त्यांची धिंड काढली.या हत्येतील आणखी एका फरार आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या मित्राने प्रॉपर्टीच्या वादातून शिक्षिकेची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह घोटी येथे आढळून आला. या हत्याकांडात आरोपीने आपल्या तीन साथीदारांची मदत घेतली आणि हा हत्याकांड घडवून आणला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
धक्कादायक ! आई आणि मुलाने केली आत्महत्या; विष प्राशन करून संपवलं जीवन
Ans: जुन्या वैमनस्यातून.
Ans: तीन आरोपींना.
Ans: आरोपींची परिसरातून धिंड काढून त्यांना अटक केली.






