Dark Jeans Care: वारंवार धुतल्याने जीन्सचा रंग उडतोय? वापरा ‘ही’ सोपी ट्रिक
पावसाच्या पाण्यामुळे अनेकदा पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होतात. तसेच दमट हवामानामुळे जीवाणू, विषाणू आणि इतर सूक्ष्मजंतू वेगाने वाढतात. दूषित अन्न किंवा पाणी शरीरात गेल्यास पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
उघड्यावर ठेवलेल्या पदार्थांवर धूळ, माशा आणि जंतू सहज बसू शकतात. त्यामुळे अशा अन्नपदार्थांचे सेवन टाळा.
फळे-भाज्या स्वच्छ पाण्याने धुतल्याशिवाय किंवा सोलल्याशिवाय खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
जेवणापूर्वी आणि स्वच्छतागृह वापरल्यानंतर साबणाने हात धुणे ही अत्यंत महत्त्वाची आणि हेल्दी सवय आहे.
खूप वेळ बाहेर ठेवलेले अन्न लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे शक्यतो ताजे आणि गरम अन्नच खावे. उरलेले अन्न योग्य प्रकारे साठवून पुन्हा नीट गरम करूनच खावे.
नेहमी उकळलेले, फिल्टर केलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्या. बाहेर जाताना स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवल्यास दूषित पाणी पिण्याचा धोका कमी होतो.
सतत अतिसार होणे, वारंवार उलट्या होणे, तीव्र पोटदुखी, ताप, अशक्तपणा किंवा शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात ताजे, स्वच्छ आणि घरी बनवलेले अन्न खाण्याला प्राधान्य द्या. पुरेसे पाणी प्या, स्वच्छतेच्या सवयी पाळा आणि अन्न बनवताना तसेच साठवताना स्वच्छता राखा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Morning Headache: रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास? दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय ‘हे’ संकेत






