Maharashtra Breaking News Updates Today:
12 Jun 2026 09:57 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची साथ सोडून तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रकाश चिक बराइक यांनी गुरुवारी पक्ष तसेच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला दिलेल्या जनादेशाच्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
12 Jun 2026 09:47 AM (IST)
दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांची, जीवनवाहिनी असलेल्या आणि ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित एसटी महामंडळ अभूतपूर्व आर्थिक संकटातून जात असल्याने ती वाचविण्यासाठी राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. या लढ्याचे नेतृत्व परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वतः करावे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केले.
12 Jun 2026 09:37 AM (IST)
वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत गेल्या १०० दिवसांहून अधिक काळ तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इराणमधील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले होते. यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. पण पुन्हा एकदा ट्रम्प यांनी संघर्ष संपुष्टात येणार असल्याचा दावा केला आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीही पुन्हा सुरु होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.
12 Jun 2026 09:05 AM (IST)
Monsoon Alert: देशात यंदा मॉन्सूनचा पाऊस रेंगाळला असल्यामुळे चिंतेचे वातावरण असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) एक अत्यंत मोठा आणि गंभीर इशारा दिला आहे. पुढील १० तास देशातील १५ राज्यांसाठी अत्यंत धोक्याचे असणार असून, या भागात ताशी ९० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
12 Jun 2026 08:59 AM (IST)
Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अत्यंत कडक शब्दांत ताकीद दिली आहे. "आतापर्यंत जे काही घडलं ते मी समजून घेतलं, पण यापुढे जर पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल, तर त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार केला जाईल," अशा स्पष्ट आणि थेट शब्दांत सुनेत्रा पवारांनी पक्षांतर्गत नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई/नवी दिल्ली देशातील बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना शह देत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधी गोटात अत्यंत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.






