Sanjay Raut Press Conference : आजकाल व्हीआयपींसाठी सर्व काही केले जाते, मात्र त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. रस्ते अडवणे ही काही मुख्यमंत्र्यांची सूचना नसते, पण प्रशासनाने योग्य नियोजन केले नाही, त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी ज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी व्हीआयपी व्यवस्थापनामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाढती महागाई, तसेच जमीन व्यवहारांबाबत त्यांनी सवाल उपस्थित केले.
संजय राऊत म्हणाले, हजार लोक रस्त्यांवर अडकलेत, याचा दोष मुख्यमंत्र्यांचा नाही तर नियोजनाचा दोष आहे. आजही आपल्याकडे व्हीआयपींच्या सोयीसाठी आखणी करायची ही प्रशासनाची मानसिकता आहे. त्यामुळे अशा घटना घडतात. या मुख्यमंत्र्यांच्या सुचना नसतात, अशा प्रकारचे उद्घाटनाचे सोहळे छोट्या पद्धतीने करायचे असतात. त्यामुळे जनतेला त्रास होत नाही. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पण हे वारंवार होत आहे. मुख्यंमंत्र्याचे लक्ष नसल्यामुळे होत आहे. हे तुम्ही केलंय ते जगाने पाहिलं आहे. हे जे सगळं झाल आहे, मुंबईतील ५६ पूल, जायकवाडी धरण, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली झोपडपट्टी पुर्नवसन योजना असतील, अन्य रस्ते मुंबई एक्सप्रेस हायवे, हे सर्वकाही तुम्हीच केलं आहे.असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
Detective Dhananjay सिरीज का पहावी, 5 कारणं; तुमचा विकेंड करेल स्पेशल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “शिंदे काय बोलतात यावर भाष्य करण्याची गरज नाही. कोरोना महामारीच्या काळाच उद्धव ठाकरे यांच्यासमोर लोकांचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते, त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. शिंदेंनी त्यांचे कौतुक करायला हवे.” असे आव्हान कोणत्याच मुख्यमंत्र्यांसमोर नव्हते. झाडे तोडणे, रस्ते बांधणे हे केव्हाही होऊ शकते, पण लाखो जनतेचे प्राण वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होते. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे गंगेत प्रेतं फेकली गेली. महाराष्ट्रावर उद्धव ठाकरेंनी तशी वेळ येऊ दिली नाही. याबद्दल एकनाथ शिंदेंनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “प्रवास महाग होणार आहे, सर्वसामान्यांचा खर्च वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र म्हणतात ‘सगळं ठीक आहे’, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे,” असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालच्या राजकारणावर भाष्य करताना राऊत यांनी Mamata Banerjee यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. “अमित शाह यांच्या आत्मविश्वासाबाबत काय बोलायचे, ते निकालातूनच स्पष्ट होईल,” असा टोला त्यांनी लगावला.






