दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस भवनसमोर निदर्शने
पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची मागणी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशातील हजारों विद्यार्थी दिल्लीत आंदोलन करत आहे. प्रशासनाने बळाचा वापर करून उपोषण कर्ते सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून हटवले. त्यानंतर संसद भवन समोर लोकशाही मार्गाने निघणाऱ्या मोर्चातील निष्पाप विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी आंदोलनस्थळावरून उचलून नेत चुकीची वागणूक दिल्याच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शहर काँग्रेसने रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
नहीं, चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, दिल्ली सरकार हाथ हाथ, मोदी सरकार निकामी है, ये सरकार बदलनी है. राजीनामा राजीनामा द्या राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशी घोषणाबाजी यावेळी करीत आणि हातामध्ये साविधांची प्रत, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शिवाजी महाराज व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा फोटो झळकावत केंद्रीय शिक्षण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसतर्फे प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, उध्दव पवार, ज्ञानेश्वर काळे, अरुण दोंदे, जयेश पोकळे, विजय राऊत सुदेश मोरे, संदीप वाध, ज्युली डिसुझा, रमेश जावव, भारत पाटील, विजय पाटील, जाकीर अत्तार, दत्ता सोनवणे, समाधान बागुल तर मनसेकडून स्तनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोबडे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, किरण खाडम, शहर निरीक्षक विजय रानाते, सत्यम खंडाळे आदी उपस्थित होते.
मनसे व काँग्रेसच्या वतीने सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन सुरु होते. मात्र अचानक संतप्त झालेल्या आंदोलकांनी रस्ता रोको अडविल्याने सीबीएसच्या वाहनांची काही काळासाठी मोठी कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत आआंदोलकाना रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून देत वाहनांना वाट करून दिली.
नीट पेपर फुटीनंतर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले, जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. निष्पाप तरुणावर लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी दिली.
केंद्रातील मोदी सरकार हे मस्तवाल सरकार असून त्यांना त्याची जागा दाखवली पाहिजे, लाठीचार्ज वेळी मुलीनी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना देखील चुकीची वागणूक देताना आली. त्याचा आम्ही निषेध करतो. विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष बबलू खैरे यांनी दिली.
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक उपोषण मागे घेणार? सरकारला पत्र लिहून ठेवली महत्त्वाची अट, म्हणाले…






