म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असलेल्या गर्वांगचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणी उपचारांत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाकाली वैद्यकिय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, शिंदे गटाकडून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावरही सोशल मीडियावरून टीका केली.
रायगड जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.
रायगडच्या खोपोलीत नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी 9 आरोपी अटकेत आहेत. आमदार महेंद्र थोरवेंनी या हत्येला ‘बीड कनेक्शन’ असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जयेंद्र शेळके यांनी शेकापची साथ सोडून भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
रायगडमध्ये नगरसेविकेचे पती निलेश काळोखे यांची भरदिवसा निर्घृण हत्या झाली. मुलांना शाळेत सोडून येताना ५–६ जणांनी तलवार, कोयत्याने २७ वार केले. CCTV समोर आल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासी शासकीय कामकाज, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी माणगावात जातात. मात्र एसटी सेवा उपलब्ध नसल्याने या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
महाडकरांसाठी आनंदाची बातमी! महाडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात पहिले AI सेंटर सुरू करण्यात आले आहे. महाडच्या हिरवळ संस्थेचा मोठा पराक्रम आहे.
माथेरानघाट रस्त्यावरील निकृष्ट डांबरीकरणाचा फटका आता वाहन चालकांना बसत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माथेरानघाट रस्त्याची अवस्था पाहून संताप व्यक्त केला जात आहे.
अलिबाग तालुक्यातील कुरुळ बायपास ते बेलकडे जाणाऱ्या महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर, विकास गोगावले हे सुशांत जाबरे यांच्याबरोबर सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे महाड विधानसभा मतदार संघाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी केला
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२५-२६ उत्साहात पार पडली.
उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत २१ वर्षांच्या तनिषा पाटील यांना विजय मिळाला आहे. महाविकास आघाडिकडून निवडणूक रिंगणात उरण नगरपरिषदेवर सत्ता मिळवण्याची ओढ भाजपा आणि विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडिला देखील होती.
मोरे गावात बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या लोकार्पणसाठी खासदार तटकरे गावात आले होते. यावेळी त्यांनी मोरबाई मंदिराला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार, असं अभिवचन दिलं आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित…
महाराष्ट्र राज्याच्या सागरीहद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. LED व्दारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्हयातील 2 मासेमारी नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेव्दारे कारवाई करण्यात आली.
पनेवल महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. २०१७ साली प्रभाग क्रमांक दहा मधून शेतकरी कामगार पक्षाकडून भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवार सरस्वती काथारा यांनी निवडणूक लढवली होती.
रायगड पनवेल विभागात खडी व गिट्टी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या समस्यांचे निवेदन महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पनवेलचे प्रांताधिकारी तसेच ग्रामीण,शहर तहसीलदारांना दिले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सिनारमास प्रकल्पासाठी पोहोच रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हा विध्वंस उघडपणे करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.