नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळत असताना, आता स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या वाटाही खुल्या होत आहेत.
महाडमध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम आता बाजारपेठेवरही दिसून येत आहे. तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचल्याने ग्राहक दुपारच्या वेळेत खरेदीसाठी बाहेर पडणे टाळत असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगडमधील महाड येथील मयूर चांदुरकर यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचार खर्च मोठे संकट ठरले. Chief Minister Medical Assistance Fund Maharashtra मधून वेळेवर मदत मिळाल्याने त्यांच्यावर उपचार शक्य झाले.
मुरुड जंजिरा परिसरातील कोस्टल हायवे प्रकल्पातील महत्त्वाचा पूल सध्या वादात अडकला आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने त्यांनी काम बंद पाडल्यामुळे सुमारे 1200 कोटींचा हा प्रकल्प थांबला आहे.
नागाव समुद्र किनारा हा उरण तालुक्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. मात्र वाढत्या गर्दीच्या तुलनेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत…
कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्चही करण्यात येतो. अंगणवाडी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये पोषण आहार पुरविण्यात येतो.
आखाती देशातील युद्धामुळे देशात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून कर्जत तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. ग्रामीण नियम लागू केल्यामुळे गॅस मिळण्यासाठी २५ ते ४५ दिवस वाट पाहावी…
भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे ऑनलाइन सेवा बंद पडून शेतकऱ्यांना सातबारा, फेरफार आणि इतर कागदपत्रांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Karjat News: कर्जत तालुक्यात उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाई गंभीर बनली असून अनेक गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधी अभावी…
उरण नगरपरिषद वार्ड क्रमांक ७ मधील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली असून अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उरण नगरपरिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत राजकारण आणि विकास यांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. बहुमताच्या जोरावर विरोधकांनी महत्त्वाच्या नागरी कामांना विरोध केल्याने नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेरळ पाडा येथील मिनीट्रेन मार्गावरील फाटक आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत.
मुरुडमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून वीज पुरवठ्याच्या अडचणींमुळे नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच मुरुड शहराला सुद्धा पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत प्रशासक काळात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कोणतीही अधिकृत नोंद नसताना 43 अनधिकृत नळजोडण्या देण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली…
कर्जत-नेरळ मार्गावरील नेरळ-खांडा येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर मनसेने गंभीर आक्षेप घेतले आहेत. कमी दर्जाच्या साहित्याचा वापर आणि निकृष्ट कामामुळे पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दासगाव-गोठे येथील सावित्री नदीवरील प्रस्तावित खाडी पूल प्रकल्प भूसंपादनाच्या वादामुळे रखडला आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यात मोबदल्यावरून मतभेद निर्माण झाले असून, प्रकल्पाच्या कामाला विलंब होत आहे.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक रायगडावर वाढत्या पाणीटंचाईमुळे संवर्धन कामांवर परिणाम होत आहे. जलस्रोत आटत चालल्याने कामांचा वेग मंदावला असून, प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
रायगड जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून 'प्रेरणा' उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या पुढाकारातून शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर
महाड तालुक्यातील दासगाव खाडी संगम परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे जलवाहतूक आणि नौकाविहार अनेक वर्षांपासून बंद आहे. स्थानिकांच्या मते तातडीने गाळ उपसा केल्यास पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो.