मराठी सक्तीच्या मुद्द्यावर मनसेने जनजागृती मोहीम सुरू केली असून रिक्षांवर मराठीतील संदेश लावण्यात आले आहेत. या उपक्रमातून मराठी भाषेचा प्रचार आणि वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कल्याण येथे उड्डाणपुलाचे काम गेल्या ७ वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला असून, काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली…
भाईंदर परिसरात मतदार याद्यांच्या ‘सुपर सखोल’ पुनरावलोकनासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. १,०००हून अधिक कर्मचारी गेल्या २० दिवसांपासून पूर्णवेळ कार्यरत आहे.
महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाला आर्थिक उभारी देण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावांपैकी ७ साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मोठा दणका दिला आहे.
जावळी तालुक्यातील महिलांनी संपूर्ण जावळी तालुका दारू दुकान मुक्त केला, मात्र या तालुक्यात दारूबंदी असताना देखील दारू जोमात विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपामुळे धाराशिव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला असून अनेक कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना विविध सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबर चालकांसाठी प्रवाशांशी मराठीत संवाद अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत.
धारूर शिवारात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.
एसटी महामंडळातील अकार्यकारी अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेणारी समिती सध्या संभ्रमावस्थेत आहे. ७६ वर्षे जुने असलेल्या या महामंडळाकडे यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक परिपत्रक नसल्यामुळे प्रशासनात गोंधळ निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘झिरो ब्युरोक्रसी’च्या दिशेने शासन वाटचाल करत असल्याचे सांगितले. प्रशासनाने स्टार्टअपप्रमाणे वेगवान, नवकल्पनात्मक आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी तब्बल १००० पेक्षा अधिक जादा बसेसचे नियोजन केले आहे.
कोळसा खाणीतून कोळसा वाहून नेताना वाहनांवर ताडपत्री झाकणे आवश्यक असते. मात्र वेकोलि प्रशासन नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक करीत असल्याने कोळसा रस्त्यावर खाली पडून धूळ प्रदूषण होत आहे.
माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचं आज मंगळवारी सकाळी ७.१२ वाजता निधन झालं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य El Niño लक्षात घेऊन राज्यात पाणी नियोजन व जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. खत वितरणावर AIद्वारे लक्ष ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून, महिला सक्षमीकरणाला मोठे बळ मिळाले आहे. बचतगटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड ९९ टक्क्यांपर्यंत झाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
उन्हाच्या तीव्रतेनंतर वातावरणात बदल होत ढगाळ स्थिती निर्माण झाली असून तापमान ४० अंशांवरून ३५ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
Brihanmumbai Municipal Corporation मधील बदली प्रक्रियेवर वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून, पाणीटंचाईच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २० एप्रिल) प्रभाग ११ मधील महिलांनी महापालिकेवर ‘घागर मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.