India-Bangladesh Visa: मुहम्मद युनूस यांचा दुर्दैवी भूतकाळ आता मागे पडला आहे; भारत आणि बांगलादेश त्यांचा व्हिसा पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलत आहेत. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
India Bangladesh Visa Restoration 2026 : दक्षिण आशियातील भू-राजकीय घडामोडींमध्ये एक अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत आणि बांगलादेश (Bangladesh) या दोन शेजारील राष्ट्रांमधील संबंधांवर साचलेली धूळ आता झटकली जात आहे. विशेषतः मुहम्मद युनूस यांच्या दीड वर्षांच्या अंतरिम सरकारच्या काळात दोन्ही देशांतील संबंधांमध्ये जो कडवटपणा आला होता, तो आता इतिहास जमा होत आहे. या मैत्रीच्या दिशेने टाकलेले पहिले मोठे पाऊल म्हणजे दोन्ही देशांदरम्यान व्हिसा सेवा पुन्हा पूर्णपणे सुरू करण्याचा घेतलेला निर्णय.
ऑगस्ट २०२४ मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेवर आले होते. या दीड वर्षांच्या काळात भारत आणि बांगलादेशमधील संबंध ऐतिहासिक स्तरावर खालावले होते. शत्रुत्वपूर्ण वृत्ती आणि अविश्वासाचे वातावरण यामुळे दोन्ही देशांमधील व्हिसा सेवा विस्कळीत झाली होती, ज्याचा फटका हजारो विद्यार्थी, पर्यटक आणि व्यापारियांना बसला होता. मात्र, आता बीएनपी सरकार सत्तेवर आल्यापासून आणि तारिक रहमान यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे दिल्ली आणि ढाका यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Updates : ‘UAEला मातीत गाडू’, इराणच्या रडारवर आता अबू धाबी; अरब राष्ट्रांमध्ये फूट पाडण्याचे भयावह इराणी षडयंत्र
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या अहवालानुसार, बांगलादेशने सर्व प्रवर्गातील भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सेवा पूर्णपणे सुरू केली आहे. नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालय, तसेच कोलकाता, आगरतळा, मुंबई आणि चेन्नई येथील वाणिज्य दूतावासे आता युद्धपातळीवर काम करत आहेत. दुसरीकडे, भारतानेही येत्या काही आठवड्यांत हळूहळू आपली व्हिसा प्रक्रिया पूर्णपणे पूर्ववत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या महिन्यात बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान यांनी जेव्हा भारताला भेट दिली, तेव्हा व्हिसा सेवा सामान्य करणे हा त्यांच्या अजेंड्यावरील मुख्य मुद्दा होता.
Moving to normalise ties after months of turmoil in the recent past, Delhi and Dhaka are taking the first step forward with full-scale resumption of visa services. While Bangladesh has resumed visas for Indian citizens across all categories, India is aiming at gradual resumption… pic.twitter.com/uGpYVvkp4H — The Indian Express (@IndianExpress) May 2, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Explosion: इराणमध्ये बॉम्बस्फोटात 14 आयआरजीसी जवान शहीद, 2 जखमी; ट्रम्प म्हणाले, ‘इराणच्या नेतृत्वात मोठी फूट’
भारत आणि बांगलादेशमधील हे संबंध सामान्य होण्यामागे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची ढाका भेट महत्त्वपूर्ण ठरली. तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून भारताने मैत्रीचे संकेत दिले होते. याला प्रतिसाद म्हणून तारिक रहमान यांनी भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या अधिकाऱ्यांना परत बोलावून विश्वासाचे वातावरण निर्माण केले. बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांनीही या बदलाचे स्वागत केले असून फेब्रुवारीपासून व्हिसा प्रक्रियेत वेगाने सुधारणा होत असल्याचे मान्य केले आहे.
दोन्ही देशांमधील या सुधारलेल्या संबंधांमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर आरोग्य सेवा, व्यापार आणि शैक्षणिक देवाणघेवाण पुन्हा एकदा रुळावर येईल. दीड वर्षांचा तो संघर्षमय काळ मागे टाकून भारत आणि बांगलादेश आता विकासाच्या एका नव्या वाटेवर चालण्यास सज्ज झाले आहेत.
Ans: बांगलादेशने पर्यटन, व्यापार आणि वैद्यकीय उपचारांसह सर्व प्रवर्गातील भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सेवा पूर्णपणे सुरू केली आहे.
Ans: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने ही सेवा पूर्णपणे पूर्ववत केली जाईल.
Ans: ऑगस्ट २०२४ नंतर सत्तेवर आलेल्या मुहम्मद युनूस यांच्या सरकारची भारताविरोधातील भूमिका आणि अस्थिरतेमुळे ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.






