नवी दिल्ली- “माफी मागायला माझे नाव सावरकर नाहीय…” असं राहुल गांधीनी (Rahul Gandhi) वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद होत आहे. सध्या राज्यासह देशात सावरकारांबाबत राहुल गांधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. यावरुन बरेच राजकारण रंगले आहे. परवा मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सज्जड दम दिल्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत सावरकरांविषयी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टिका केली. यावेळी तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना विचारला आहे. यानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गट, भाजपावर टिका केली आहे.
सावरकरांशी भाजपा व RSSचा संबंध काय?
दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, स्वातंत्र्यसंग्रामात भाजपा व आरएसएस कुठे होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे, आम्ही सावरकर जगलो आहोत, जगत आहोत, त्यामुळं भाजप व शिंदे गटाने आम्हाला सावरकारांबद्दल शिकवू नये. तसेच सावरकरांशी भाजपा व आरएसएसचा संबंध काय? असा सवाल संजय राऊतांनी विचारत, भाजपावर टिका केली.
…तर चर्चेतून मार्ग निघेल
काल विरोधीपक्षाची बैठक पार पडली, आम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण शरद पवारांनी देखील सावरकाराविषयी वादग्रस्त बोलणं टाळले पाहिजे. सावरकर हे स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचे नेते होते. त्यांचे कार्य मोठे आहे, सावरकरांचा संघाशी काही संबंध नव्हता, असं पवारांनी काँग्रेसला पटवून दिलं आहे. आम्हाला काँग्रेसची भूमिका पटली नाही, म्हणून आम्ही काल बैठकीला गेलो नाही. पण सावरकरांच्या मुद्दावरुन आमची बोलणं राहुल गांधींशी सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री विचारुन बोलतात…
भाजपाने किंवा शिंदे गटाने आम्हाला सावरकर शिकवू नये. सावरकर आमच्यासाठी दैवत आहे. पण काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री कागदावरील वाचून सांगत होते. पुढे फडणवीस यांना विचारुन बोलू का, असं विचारत होते, यावरुन शिंदे हे किता दबावाखाली आहेत, हे दिसते. दरम्यान, मुंबईतील वीर स्वातंत्र्यावीर सावरकर स्मारक उभारण्यात हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा असल्याचं राऊतांनी म्हटले. पण चर्चेतून मार्ग निघेल, आमची राहुल गांधींशी बोलणी सुरु आहेत, असं राऊत म्हणाले.