आयसीसीने नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत बैठक घेतली. त्यानंतर, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान खेळणार असल्याची घोषणा करण्यात आली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीसमोर एका मागून एक मागण्या पुढे करत आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर एक नवीन मागणी मंडळी आहे.
भारतासोबत टी-२० विश्वचषक सह-यजमानपद भूषवत असूनही, श्रीलंका या वादात पूर्णपणे गप्प आहे. बांगलादेश क्रिकेट सचिव बंदुला दिसानायके यांनी अखेर या वादाबद्दल एएफपीशी संवाद साधला.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा वादात सापडली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी देत असून आयसीसीने त्यासाठी एक प्लान तयार करत आहे.
बांगलादेशी पत्रकारांना श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यांचे वार्तांकन करण्यासही बंदी घातली जाईल. या संदर्भात आयसीसीकडून कोणताही अधिकृत शब्द आलेला नसला तरी, कव्हरेजसाठी बांगलादेशी क्रीडा पत्रकारांना आयसीसीने मान्यता दिली नाही.
पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक गिलेस्पी यांनी आयसीसीवर निशाणा साधला आहे आणि भारताला कारण म्हणून सांगितले आहे. तर पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार आफ्रिदीनेही आयसीसीच्या दुटप्पी निकषांवर टीका केली.
बांगलादेश टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्याने आणि त्याजागी स्कॉटलंडला स्थान मिळाल्याने वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. स्कॉटलंडने इंग्लंड, इटली, वेस्ट इंडिज आणि नेपाळसह गट क मध्ये बांगलादेशची जागा घेतली.
नक्वी यांनी बांगलादेशला वगळण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर टीका केली होती आणि त्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला होता. पाकिस्तानने टी-२० विश्वचषकातून माघार घेतली तर आयसीसी अशी पावले उचलण्यास तयार आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बांगलादेश संघाने अधिकृतपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.बांगलादेशच्या या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) सामन्यादरम्यान लाईव्ह टेलिव्हिजनवर त्यांच्या देशातील क्रिकेटवरील प्रेमाबद्दल सांगितले.
अध्यक्ष जय शाह सध्या दुबईमध्ये आहेत आणि बांग्लादेशच्या विश्वचषकातून माघार घेण्याची अधिकृत घोषणा देखील शक्य आहे. बांग्लादेशला या स्पर्धेसाठी ग्रुप सी मध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या जागेवर दुसऱ्या संघाला संधी…
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बांगलादेशकडून अधिकृत माघार घेण्यात आली. बंगालदेश सरकारच्या या निर्णयावर बांगलादेश क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना या स्पर्धेत भारतात खेळायचे होते.
बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल आज, गुरुवार, २२ जानेवारी रोजी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना भेटतील आणि त्यांना विश्वचषकात बांगलादेशच्या सहभागाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती देतील.
बांगलादेशने भारतात जाण्यास नकार दिला तर आयसीसी बोर्डाने बदली संघ पाठविण्याबाबत मतदान करण्यात आले आहे.बांगलादेशला भारतात टी२० विश्वचषकातील सामने खेळण्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक दिवस देण्यात आला आहे.
आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. आयसीसीने आता बांगलादेशला यासंदर्भात अंतिम मुदत दिली आहे. आयसीसीने २१ जानेवारीपर्यंत बांगलादेश टी-२० विश्वचषकात सहभागी होईल की नाही हे ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असताना बांगलादेशने भारतीय वंशाच्या आयसीसी अधिकाऱ्याला व्हिसा नाकारल्याने वाद निर्माण झाला आहे.
गुरुवारी, क्रिकेटपटूंच्या बहिष्कारामुळे दोन सामने पुढे ढकलण्यात आले. खेळाडू आणि जनतेच्या दबावाखाली, बीसीबीने कारवाई केली आणि नझमुलला बोर्डाच्या वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. खेळाडूंनी २०२५-२६ बांगलादेश प्रीमियर लीगवर बहिष्कार टाकला आहे. सामन्यांपूर्वी खेळाडू स्टेडियमवर पोहोचलेही नाहीत, ज्यामुळे बोर्ड कठीण परिस्थितीत सापडले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वित्त समितीचे अध्यक्ष नझमुल इस्लाम यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या क्रिकेटपटूंनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर क्रिकेटवर बहिष्कार टाकतील.
बांगलादेशमध्ये बांगलादेश सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा सामना सुरू असताना क्षणात सामना भांडणात रूपांतरीत झाला. यामध्ये खेळाडू जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.