वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ५ हजार १६२ हेक्टरने वाढले आहे.
चिखलीतील जयस्तंभ चौक परिसरात रविवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. भेळ सेंटर, फळांचे दुकान, घड्याळाचे दुकान तसेच इतर काही लहान दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
जिल्ह्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत दिले.
Amdapur येथील इंदिरानगर परिसरात शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत सुमारे एक हेक्टर क्षेत्रातील गहू पिकासह स्प्रिंकलर संच आणि पाईप जळून खाक झाले.
महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून प्रलंबित समस्या सोडविणे हा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुकांमध्ये निराशा पसरली आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असतानाच अचानक ब्रेक लागल्याने राजकीय वातावरण शांत झाले.