
Maharashtra breaking News Marathi
18 Feb 2026 12:40 PM (IST)
हिसार येथे पतीनेच दोन महिन्यांच्या गर्भवती पत्नी महकची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा मृतदेह माहेरी पोहोचताच कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलिसांनी गुन्हा दाखल
18 Feb 2026 12:30 PM (IST)
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अतिशय संतापजनक असतात, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याच्या एक गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक सर आपल्या Gen Alpha विद्यार्थ्यांसोबत हटके स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
18 Feb 2026 12:20 PM (IST)
टेकप्रमींना आणि विशेषत: अँड्रॉईड यूजर्सना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण लवकरच येणार आहे. टेक दिग्गज कंपनी गुगलने त्यांचा वर्षातील पहिला आणि सर्वात मोठ्या ईव्हेंटची घोषणा केली आहे. कंपनीने ईव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. तसेच याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. टेक दिग्गज कंपनी गुगलने त्यांच्या वर्षातील सर्वात मोठ्या डेवलपर कॉन्फ्रेंस Google I/O 2026 च्या तारीख जाहीर केली आहे.
18 Feb 2026 12:10 PM (IST)
पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि लोकसहभागाच्या बळावर राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली पर्यावरणपूरक वाटचाल अधोरेखित केली आहे. जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींनी विविध लोकसंख्या गटांत उल्लेखनीय कामगिरी नोंदवत सुमारे साडेदहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.
18 Feb 2026 12:00 PM (IST)
राज्य शासनाने बांधकाम मजुरांना आर्थिक बळकटी देण्यासाठी बांधकाम कामगार योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थी बांधकाम कामगारांना घरकुलासाठी आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा व त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती ही दिली जात असल्याने बांधकाम कामगारांसाठी (Construction Workers) ही योजना वरदान ठरली आहे, मात्र या योजनेचा लाभ खऱ्या बांधकाम कामगारांना न मिळता तो बोगस कामगारांना दिला जात असून हा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन एजंटानी शासनाचीच लुट सुरु केली असल्याचा प्रकार माण तालुक्यात घडत आहे.
18 Feb 2026 11:50 AM (IST)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात गुरुवारी (दि.१९) सकाळी ७.३० वाजता मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सांगली ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
18 Feb 2026 11:40 AM (IST)
आज ‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर ट्रेलरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांनी चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढील भाग असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
18 Feb 2026 11:30 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुशांत संतोष भोजने (२० वर्ष, रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
18 Feb 2026 11:20 AM (IST)
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची मुंबईत ऐतिहासिक बैठक झाली. या भेटीने भारत-फ्रान्स संबंध एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चेनंतर स्पेशल स्ट्रॅटेजिक ग्लोबल पार्टनरशिपची घोषणाही करण्यात आली आहे. याच वेळी मॅक्रॉन यांनी भारताचे भरभरुन कौतुक केले आहे. त्यांनी जय हो चा नारा देत भारताच्या तांत्रिक प्रगतीवर मोठे विधान केले आहेत. तसेच या भेटीत दोन्ही देशांतील भविष्यातील सहकार्याचा आराखडाही मांडण्यात आला आहे.
18 Feb 2026 11:10 AM (IST)
एआय म्हणजेच कृत्रिम बुदधीमत्तेबाबत आमचा दृष्टीकोन अगदी स्पष्ट आहे, एआयने जागतिक विकासाला गती द्यावी, परंतु तो पूर्णपणे मानवकेंद्री राहिला पाहिजे. एआय मानवी क्षमता वाढवू शकते, पण अंतिम निर्णयाची जबाबदारी नेहमी माणसाकडेच असली पाहिजे. तंत्रज्ञान मानवाची सेवा करण्यासाठी आहे, त्याची जागा घेण्यासाठी नाही. या क्षेत्रात आम्ही केवळ प्रतिभा विकसित करत नाही आहोत, तर भारताने एआय क्रांतीत सहभागी होण्यापासून ती घडविण्याकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, धोरणात्मक व्यवस्था आणि कौशल्यांचा पाया उभारत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
18 Feb 2026 10:55 AM (IST)
18 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
18 Feb 2026 10:50 AM (IST)
भारत २०,००० अधिक जीपीयू जोडण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे देशातील एआय कंप्यूट इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याच्या उद्देशाने एकूण उपलब्ध क्षमता सध्याच्या ३८,००० जीपीयूंपेक्षा जास्त होईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले. जीपीयू किंवा ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट ही एक शक्तिशाली संगणक चिप आहे जी मशीनला जलद विचार करण्यास, प्रतिमा प्रक्रिया करण्यास, एआय प्रोग्राम चालविण्यास आणि नियमित प्रोसेसरपेक्षा जटिल कामे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यास मदत करते.
18 Feb 2026 10:45 AM (IST)
मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केल आहे. याशिवाय मुस्लीम समाजासाठी राबवण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेलाही ब्रेक लावण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला हे आरक्षण दिले होते. तेव्हापासून ही प्रक्रिया राबवली जात होती. पण आता राज्य शासनाने सुधारित शासन निर्णय आणि परिपत्रक जारी केल आहे. यात मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द कऱण्यात आले आहे. राज्य सरकारच्या यानिर्णयामुळे राजकीय वातावरण मात्र तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
18 Feb 2026 10:40 AM (IST)
शिवपुरीच्या मुक्तिधाममध्ये एका अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक वन विभागाचे पथक आले आणि त्यांनी चितेवरील मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत नेण्याची घाई केली. खरंतर घडलं असं की, मृत झालेला तो व्यक्ती वन विभागाचा कर्मचारी होता ज्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. सरकारी प्रक्रिया आणि फायदे सुनिश्चित करण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे विभागाने म्हटले आहे आणि म्हणूनच मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चितेवरुन उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
18 Feb 2026 10:34 AM (IST)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांना नेहमीच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी चाहत्यांची नेहमीच गर्दी होताना दिसत असते. मात्र यावेळी हास्यजत्रेच्या शिलेदारांनाच खास ‘फॅन मोमेंट’ अनुभवण्याची संधी मिळाली आहे. कारण सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा याला भेटण्याचा योग ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकातील कलाकारांना मिळाली आहे. काही क्षणांची ही भेट कलाकारांसाठी आयुष्यभराची आठवण ठरली आहे.
18 Feb 2026 10:00 AM (IST)
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हल्ली तरुण वयातील मुलामुलींना कोणत्याही वयात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येत आहे. हृदयरोगाचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. चुकीच्या वेळी जेवण, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल पुढे जाऊन गंभीर आजारांचे कारण बनते. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, स्ट्रोक इत्यादी गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे आजारांपासून बचाव करण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले अनावश्यक फॅट शरीरासाठी धोक्याचे ठरते.... वाचा सविस्तर-
18 Feb 2026 09:55 AM (IST)
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर १ कोटी ३३ लाख 752 रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आलं आहे. हा गैरप्रकार दक्षाता पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकानंच केल्याचे समोर आले आहे. या पेट्रोल पंपाचं व्यवस्थापक पद पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक वाघ मधुकर यांच्याकडे होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप उत्तमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अपहाराचा गुन्हा वाल्मिक मधुकर वाघ यांच्या फिर्यादीवरून दाखल केला आहे. वाचा सविस्तर-
18 Feb 2026 09:52 AM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकार होत असलेल्या ‘शतक’ या चित्रपटाबाबत देशभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नवी दिल्लीतील केशव कुंज येथे आयोजित विशेष कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चित्रपटाविषयी मनोगत व्यक्त करत त्याला केवळ एक चित्रपट नव्हे, तर एका वैचारिक आणि राष्ट्रीय प्रवासाचे जिवंत चित्रण असे संबोधले आहे. वाचा सविस्तर-
18 Feb 2026 09:46 AM (IST)
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. प्रत्येक ऋतूनुसार हवामानात सतत काहींना काही बदल होत असतात. कधी ऊन तर कधी पाऊस, थंडी पडत असल्यामुळे आरोग्य बिघडते. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येणे, त्वचा काळी पडणे. केसांमध्ये कोंडा होणे याशिवाय त्वचेच्या इतरही बऱ्याच समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, काळे डाग, मुरूम आणि सुरकुत्या त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सला बऱ्याचदा खूप जास्त खाज सुटते तर काहीवेळा पिंपल्समधून पाणी किंवा पू येतो. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. वाचा सविस्तर-
18 Feb 2026 09:41 AM (IST)
हिरव्या मुगडाळीचे अप्पे हे पारंपरिक चवीला आधुनिक हेल्दी ट्विस्ट देणारे उत्तम नाश्त्याचे पदार्थ आहेत. दक्षिण भारतीय पद्धतीतील अप्यांमध्ये हे अप्पे बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊसर लागतात. हिरवी मुगडाळ ही प्रथिनांनी, फायबरने आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध असल्यामुळे हे अप्पे पोटभरीचे आणि आरोग्याला पौष्टिक ठरतात. वाचा सविस्तर-
18 Feb 2026 09:40 AM (IST)
नाशिक : परीक्षेचा ताणतणाव, जेईईसारख्या परीक्षेचा निकालाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतो. विद्यार्थीनुरूप यश-अपयश ठरते. मात्र, सध्याची स्पर्धाच इतकी तीव्र झाली की, त्यात विद्यार्थ्यांना पुढे फरफटत जाण्याशिवाय पर्यायच राहत नाही. काही निभावून घेतात, तर काही कोवळे जीव मात्र स्पर्धेच्या पलीकडे पोहचतात. अशीच एक दुर्देवी घटना जयभवानी रोड परिसरात घडली.
18 Feb 2026 09:20 AM (IST)
पुणे/मुंबई: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतरही वाहनचालकांकडून टोल आकारण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) कडक पाऊल उचलले आहे. या प्रकरणी संबंधित टोल ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून, ज्या वाहनचालकांकडून टोल वसूल करण्यात आला आहे, त्यांना ती रक्कम परत करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अपघात आणि ५० किलोमीटरची कोंडी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास खंडाळा घाटातील अदोशी बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रोपिलीन वायू वाहून नेणारा एक टँकर उलटला होता. गॅस गळतीचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. या अपघातामुळे महामार्गावर तब्बल ५० किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी आणि वाहनचालक तासन्तास अन्ना पाण्याविना महामार्गावर अडकून पडले होते.
18 Feb 2026 09:15 AM (IST)
पुणे: पुणेकर सध्या फेब्रुवारी महिन्यातच कडक उन्हाचा अनुभव घेत असताना, आता रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे. शिवाजीनगर भागात सोमवारी किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस होते, त्यात मंगळवारी एकाच दिवसात ४ अंशांची वाढ होऊन ते १८.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. रात्रीच्या तापमानात झालेली ही वाढ सरासरीपेक्षा ५.५ अंशांनी जास्त असल्याने पुणेकरांना आता रात्रीचा उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच किमान तापमानाने १८ अंशांचा टप्पा ओलांडणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.
मिश्र वातावरणाची झाली समाप्ती? फेब्रुवारीच्या सुरुवातीला पुणेकर दिवसा ऊन आणि पहाटे गारवा अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव घेत होते. मात्र, मंगळवारच्या नोंदीनुसार किमान तापमानात झालेली झपाट्याने वाढ पाहता, पहाटेचा गारवाही आता कमी झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, पुढील काही दिवसांत उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याची चाहूल यंदा वेळेआधीच लागल्याने पुणेकरांना आतापासूनच वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
18 Feb 2026 09:05 AM (IST)
मुंबई: भारत दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या मुंबई भेटीत केवळ राजकीय आणि धोरणात्मक चर्चाच केली नाही, तर भारताची सांस्कृतिक ओळख असलेल्या 'बॉलिवूड'मधील दिग्गज कलाकारांशीही संवाद साधला. मंगळवारी झालेल्या एका खास कार्यक्रमात मॅक्रॉन यांनी चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन कला आणि संस्कृती या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
दिग्गज कलाकारांची मांदियाळी या खास भेटीदरम्यान बॉलिवूडमधील नामवंत अभिनेते, दिग्दर्शक आणि संगीतकार उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अनिल कपूर, शबाना आझमी, मनोज बाजपेयी, झोया अख्तर, रिचा चड्डा, रिकी केज या कलाकरांशी संवाद साधला.
18 Feb 2026 09:00 AM (IST)
कोलंबो: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये श्रीलंकेने (Sri Lanka) जबरदस्त कामगिरी करत २०२१ च्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेने स्पर्धेच्या 'सुपर-८' (Super-8) फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी केलेल्या एका विधानाची सध्या क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
भारतीय प्रशिक्षकांचा 'मास्टरस्ट्रोक' ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर जयसूर्या यांनी आपल्या यशाचे गुपित उघड केले. श्रीलंकेच्या या यशात दोन माजी भारतीय प्रशिक्षकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. जयसूर्या यांनी प्रामुख्याने आर. श्रीधर आणि विक्रम राठोड यांच्या नावाचा उल्लेख केला.
18 Feb 2026 08:55 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीत आता एक नवीन पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणातील 'ब्लॅक बॉक्स' (Black Box) जळाल्यावरून थेट सवाल उपस्थित केला असून, या संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे या अपघाताच्या तपासाभोवती संशयाचे जाळे अधिक गडद झाले आहे.
मिटकरी यांच्या मते, विमानाचा ब्लॅक बॉक्स अशा प्रकारे तयार केलेला असतो की, तो उच्च तापमानातही जळत नाही किंवा वितळत नाही. मग या विशिष्ट अपघातात तो 'जळाला' कसा, हा मुख्य प्रश्न आहे. सामान्यतः विमानाचा ब्लॅक बॉक्स त्याच्या शेपटीच्या भागात सुरक्षित असतो, कारण अपघातात हा भाग तुलनेने कमी बाधित होतो. "अपघात झालेल्या विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत असून ती अजिबात जळालेली नाही, मग तिथे असलेला ब्लॅक बॉक्स डॅमेज कसा झाला?" असा सवाल त्यांनी केला आहे.
मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई: मुस्लिम समाजाला (Muslim Community) देण्यात आलेल्या ५ टक्के आरक्षणाबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. या आरक्षणासंदर्भात असलेला जुना शासन निर्णय (GR) रद्द करण्यात आला असून, यामुळे मुस्लिम समाजासाठी राबवली जाणारी जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रिया आता पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
२०१४ चा शासन निर्णय रद्द तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २३ डिसेंबर २०१४ रोजी मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता राज्य शासनाने सुधारित शासन निर्णय प्रकाशित केला असून, त्यात २३ डिसेंबर २०१४ चा तो मूळ आदेश रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.